काही वर्षापूर्वी निवडणुकीची चाहूल लागताच / निवडणूक जाहीर
होताच इच्छुक उमेदवारांची एकाच धांगल उडत. त्यावेळी प्रचाराची साधने मर्यादित
होती. जनसंवादाची साधने परंपरागत होती. त्यासाठी प्रचार पत्रिका / भित्तीपत्रिका, भिंतीची सजावट करणे, वडाप/टमटम वरती कर्णे लावणे, सभा समारंभ व मेळावे घेणे यासारख्या साधनांच्या वापर
सर्वत्र केला जात. परंतु काळ बदलत गेला. युवकांचा उदय / युवकांचा वाढता सहभाग हा निवडणुकीच्या प्रक्रियेतील क्रांतिकारक बदल ठरला. त्यातच
समाज्यात संवादाच्या साधनात प्रगती घडून आल्यामुळे त्याचे स्वरूप बदलून टाकले.
सोशल मिडिया हेच सर्वाधिक संवादाचे गतिशील साधन बनले. त्यामुळे येणाऱ्या काळात
विशेषतः निवडणुकीत या साधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. ज्या
उमेदवारास साधा मोबाईल फोन हि वापरता येत नसे तो आपले स्वत:चे पेज / खाते / ग्रुप सोशल मेडियावर चालू केले आहे. त्यामुळे
निवडणूक काळात सर्वाधिक खर्च या
माध्यमातून होणार आहे. यास्तव निवडणूक आयोगास सोशल मेडिया चा वापरावर नियंत्रण /
लक्ष ठेवून केल्या जाणार्या बेकायदेशीर खर्चास लगाम घातला पाहिजे.
No comments:
Post a Comment