11 July 2014

आरक्षणाची वास्तवता

सद्य परिस्थितीमध्ये समाज्यात एकाच विषयाचे वारे वाहत आहेते म्हणजे "आरक्षण" होय. महाराष्ट्र शासनाने सद्या 'मराठा समाजला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. लगेचच समाज्यातील विचारवंत,जाणकार,सामाजसुधारक व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांना समाज्यातील समानतेचा मुद्दा पुढे करून आरक्षणावरून मतांची आणि विचारांचा पाउस पडला. तो इतका मुसळधार होता कि समाज्यात विचारांच्या ओल्या  दुष्काळाची समस्या निर्माण झाली. त्यातून अनेक तर्क वितर्क काढण्यात आले. नवीन  विचार प्रथमच समोर आले. विचारांचे युद्ध निर्माण झाले. अनेकानी त्यावरती मते  प्रकट केली. खरेतर हि प्रक्रिया समाजनिर्मितीसाठी आवश्यकच असते. परंतु आरक्षणाच्या  निर्णयावरून एक मात्र घटना चांगली व हितकारक ठरेल अशी घडून आली पाहिजेती  म्हणजे आरक्षणाचे निकष आणि तरतुदी होय. खरच घटनाकारांनी परिस्थिती विचारात  घेवून व समतोलीत सामाज प्रक्रीयेसाठी मागास व पिढ्यानुपिढ्या शोषित प्रवर्गास  आरक्षण दिले. त्यामुळे उपेक्षित वर्गास विकासाच्या मार्गात आपला व पर्यायाने  समाजाच्या विकास सध्या करणे शक्य झाले. शिक्षणाच्या सोई-सुविधाबरोबरच आर्थिक मदत प्राप्त झाली. यामुळे समाजातील उपेक्षित व मागास वर्गास विकासाच्या  मार्गाबरोबर सत्तेच्या मार्गात सहभागी होता आहे. त्यामुळे समाज्यातील अनिष्ट रूढी प्रथा  परंपरा नष्ठ होण्यास मदत झाली.
माणूस खर्या अर्थाने मनुष्याच्या समाजात वास्तव  करू लागला.. काळ बदलत गेलापरिस्थिती बदलत गेली. प्रगतीचे  मार्ग बदलत गेले. विकासच्या व सामाजीक प्रगतीच्या मार्गात कालानुरूप बदल होत गेलेपरंतु हि प्रक्रिया होत असताना 'आरक्षणाच्या नियम व निकषयामध्य कालानुरूप  बदल होत गेले नाही. ज्या कारणांसाठी व ज्या घटकांसाठी आरक्षण देलेले होतेते घटक  आजही मागास आणि विकासच्या प्रक्रियेपासून वंचित पहावयास मिळतात. त्याचे  महत्वाचे कारण म्हणजे. परिस्थिरूप आरक्षणाच्या नियमात आणि निकषामध्ये बदल  घडून आले नाहित. याच्या प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष परिणाम घडून आला . तो म्हणजे  "मागास सामाज्यामध्येच आर्थिक व शैक्षणिक विषमता निर्माण होत गेली. एकदा व्यक्ती आरक्षणाच्या आधारे एखाया सरकारी  नौकरी मध्ये स्थान पटकावले. त्यामुळे त्यासा आपली आर्थिक,सामाजिक परस्थिती  उंचावता आली. त्याच्या पुढील पिढीस खर्या अर्थाने सर्व घटकांचा लाभ घेता आला. परंतु  या परस्ठीतीमध्य त्या व्यक्तीच्या पुढील पिढीला आरक्षणाचा लाभ देता कामा  नये. नाहीतर त्या व्यक्तीची पुढील पिढी एखाद्या आरक्षणाच्या स्पर्धेत त्याच्याच  समाजातील मागास व उपेक्स्ठी घटकाची जागा घेते. त्यामुळे पिद्यानुपिद्या आजही  ग्रामीण व मागास भागातील व्यक्ती खर्या अर्थाने आरक्षणाचा लाभ गेट नाही. (अपवाद  वगळता ).
विचाराच्या प्रक्रीयेमाद्ये असताना घडलेली एक घटना  डोळ्यासमोर नाचू लागली. एक गाव होता. त्या गावामध्ये एका मागास प्रवर्गातील मुलगा  खूपच हुशार व ताल्लक बुद्धीचा होता. गावामध्ये मिळणाऱ्या सुविधा तश्या खूपच कमीपण त्याने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या व अविरत कष्टाच्या सहाय्याने शिक्षण घेत  राहिला. परिस्थितीवर मत करीत त्याने उच्च शिक्षण पूर्ण केले. स्पर्धात्मक वातारवणात त्यास मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ मिळालाआरक्षणाच्या सहायाने तो  महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्यामुळे प्रगतीच्या व विकासच्या सर्व  बाजू त्यास अनुकुल झाल्या. या ठिकाणी आरक्षणाचा खर्या अर्थाने त्यास फायदा झाला. परंतु समस्या आहे ती पुढील पिढीच्या आरक्षणाचा लाभाची. त्या प्राध्यापक व्यक्तीची  पुढील पिढीला शिक्षणाच्या व आर्थिक बाजूच्या कोणत्याच परिस्थितीला तोंड द्यावे लागले नाही. त्याची पुद्धील पिढीतील त्याचा मुलगा शहरातील सुख सुविधात वाढत  होता. त्यास सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. तो मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षण पूर्ण करीत असताना स्पर्धात्मात परिक्षेची तयारी करत होता. त्याच वेळेस त्याच्याच प्रवर्गातील व ग्रामीण भागातील मुलगा अध्चानीचा सामना करीत स्पर्धात्मक परीक्षेची तयारी होता. दोघे युवक त्या स्पर्ध्त्मक परीक्ष्या आत्मविश्वासाने सामोरे गेले. शेवटी निकालाचा दिवस उजाडला. परंतु त्या प्राध्यापकाच्या मुलास आरक्षण कोठ्यातून निवडण्यात आले होते आणि तो ग्रामीण भागातील युवकास फक्त १ गुणांनी डावलण्यात आहे होते. याठिकाणी खर्या अर्थाने ग्रामीण भागातील युवकास आरक्षणाचा लाभ मिळावयास हवा होता. परंतु त्याप्रकारे झाले नाही. या ठिकाणी असे दिसून येते कि एकाच प्रवर्गातील असणाऱ्या परंतु दोन भिन्न परिस्थितीत वाढणार्या युवक आहेत. परंतु ज्याला खर्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे त्या व्यक्तींना आरक्षण मिळत नाही. त्यामुळे समाज्यात सध्या स्थितीत असे दिसून येते कि आज मागास व उपेक्षित वर्गाचे शोषण खर्या अर्थाने त्याच वर्गातील उच्च व शिक्षित समाजाकडून होत आहे. (ही बाब तर प्रेत्येक प्रवार्हात दिसून येते)त्यासाठी आरक्षणाच्या "नियम व निकष" यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.



No comments:

Post a Comment