28 April 2017

सेंद्रिय शेतकर्‍याचे 'बळीराजा' जीवन



आधुनिकतेचा साज चढवलेल्या डिजिटल युगाच्या तंत्रज्ञानाधारित जगात मी की जी नशिबाने मातीशी नाल जोडलेला व बळीराजा नावाने हिणवला जाणारा एक शेतकरी. शहरीकरण्याच्या पळण्यात वाढलेला प्रत्येक सृजनशील बालकापासून ते सुसंस्कृत अशा जागरूक नागरिकांना तसा मी पहिल्यापासून परिचयाचा. कारण चालू काळातसुद्धा माझी या सर्वांसाठी एक पोषणकरता, अन्नदाता तर राजकीय नेत्यांसाठी बळीराजा म्हणून विशेष ओळख आहे. त्यामुळे मला कधीच कोणत्या ठिकाणी आपली ओळख करून देण्याची गरज भासली नाही. परंतु सध्याचा कॅशलेश व्यवहारांच्या वेगापेक्षा जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या नावाने राज्य करणार्‍या व प्रतिगामी म्हणून ओळखल्या असलेल्या समाजात मान ताठ करून जगणे आत्तापासूनच अवघड वाटत आहे. आपल्याच समाजातील अशी जाणकार वा उच्च विभूषित  मंडळी की ज्यांनी शेतात कधी पायाचा अंगट्याचा नखही कधी ठेवला नाही, ती कृषी क्षेत्रातील बदलत्या घडामोडींचे बुलेट ट्रेनच्या वेगासारखे विश्लेषण करून आत्महत्तेचा दोष शेवटी शेतकर्‍यांच्या माथी चिटकाऊन नॉट रीचेबल होतात. तेंव्हा माझ्यासारख्या शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेणार्‍या मुलास असा प्रश्न पडतो की, अशी कोणती परिस्थिति निर्माण झाली की बळीराजा नावाने ओळख असलेल्या माझ्या बापजात्या वर्गास आत्महत्या करण्याची वेळ आली. समाजात असा काय बदल झाला की ज्यामुळे शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर आला आहे. या सर्व घडामोडींचा विवेकी नजरेने पाहिल्यास मला असे जाणवते की, शेतकर्‍याच्या आजच्या परिस्थितीस शेतकरीच जबाबदार आहे. कारण त्याने अन्नाचे घास भरवण्याचा रासायनिक शेतीचा जो काही मक्ता घेतला आहे त्यातच शेतकरी वर्गाच्या विनाशेची बीजे रोवली आहे.

            भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा विचार केल्यास आपणास असे दिसून येते की, बळीराजाचे राज्य आनंदी, समाधानकारक व सुखसमृद्ध होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साधारणतः दीड दशक म्हणजे 1965 पर्यंत त्यात खंड पडला नव्हता. परंतु जेव्हा देशात अन्नटंचाई निर्माण झाली होती तेंव्हा रासायनिक शेतीचे धोरण शेतकारांच्या माथी मारण्यात आले. त्यामागे जरी माणुसकीचा व पोटभर अन्न प्राप्तीचा हेतु असला तरी त्यातून जो काही शेतकर्‍यांचे व पर्यावरणाचे नुकसान झाले ते आजतागायत सुधारले नाही. कारण रासायनिक वा कृत्रिम शेतीतून जे काही शेती उत्पादन वाढले की त्यातून मागणी-पुरवठ्याचे गणितच विस्कळीत झाले. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहील अशी कायमचीच परिस्थिती निर्माण झाली. याचा सकारात्मक परिमाण घडून आला असे नाही. जे काही सकारात्मक आर्थिक परिणाम घडून आले ते सर्व भांडवलदार असलेल्या शेतकरी वर्गास मिळाले. आजही साकलिक अर्थशास्त्राच्या दृष्टीकोणातून पहिल्यास, सुधारित वा  तंत्रज्ञान आधारित शेतीही भांडवलदार वर्गाच्या दावणीस बांधली आहे. त्यामुळे मागणी-पुरवठा आधारित असणार्‍या बाजारपेठेत लहान शेतकरी आत्महत्याच करतो. यावर एकच उपाय, तो म्हणजे पारंपारिक वा शून्य खर्चाधारीत सेंद्रिय शेतीचा अवलंब. त्यामुळे पुवठ्यापेक्षा मागणी जास्त होईल व बाजारात प्रत्येक मालास राजाचा भाव मिळेल. त्यातूनच शेतकरी वर्गास पुन्हा बळीराजाचे जीवन येईल. ( क्रमश: )