12 July 2014

गुरुपैर्णिमा: अपेक्षा व बदल

          सकाळी सकाळी मोबाईल वरील मेसेजमुळे  माझी झोपमोड झाली. अर्धवट डोळे उघडे करून संदेश वाचू लागली. संदेश वाचत असताना आज गुरुपैर्णिमा असल्याचे समजले. वसतिगृहातील सर्व मुळे आपापल्या गुरूजणांना सुभेच्छा देत होती तर काही जण मोबाईल वरून संदेश पाठवत होते.त्यातील काही विद्यार्थ्यांनी बाजारातून विकत आणलेल्या भेटवस्तू पाहत होते. मनामध्ये  विविध विचारांची जंत्री भरून आली. आपल्या व्यक्तिमत्व विकासास चालना देऊन परिस्थितीशी लढण्याचे  सामर्थ्य अंगी यावे  म्हणून आपल्या शिकवाणीतून पाल्यास घडवणारे  गुरूजन यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस होय. आपल्या  आयुष्यात येणाऱ्या गुरुजनांच्या जागी विविध व्यक्तिमत्व उभे राहतात. त्यातील काही व्यक्तिमत्व आपल्याला अधिक भावतात तर काही व्यक्तिमत्वे म्हणावी तशी भावात नाहीत. त्यातील आपल्या आवडत्या व्याक्तीमात्वाना सुभ्येच्या देण्याचा अजज्चा हा सुभ दिवस मनाला जातो.
          मला आजच्या दिवसाचे पहिल्यापासून खुप नवल वाटत आले आहे. आपल्या गुरुजनांना आठवण्याचा/ शुभेच्छा देण्याचा हा एकच दिवस कसा काय ? प्रत्येक वेळी आपल्याला घडवणारे गुरुजन फक्त एकाच दिवशी कसे काय आठवतातसामाज्यामध्ये केल्या जाणाऱ्या प्रथापैकी हि एक प्रथा असल्यामुळे ती आपण साजरी करतो का ? इतर लोक काय म्हणतील म्हणून ती साजरी करावी लागते का ? असे प्रश्न आजवर खुपदा  मनात येऊन गेले. आपल्याल्या घडवणाऱ्या व्यक्तींचा  सदा-सर्वदा आपण आदर राखतो पाहिज. वर्तमान काळ व भविष्यकाळामधी परिस्थिती (आर्थिकसामाजिकराजकीयसांस्कृतिक,नैतिक) व त्यातील बदल यांच्याशी लढा देण्यासाठी आदर्श उर्जेचे स्थान म्हणजे गुरुचे स्थान होय. गतकालीन कालखंडातील गुरुजन यांना त्याप्रकारची जाणीव होती.आपले वर्तन हेच आपल्या पाल्यांना घडवणारे साधन होते. उपदेश न करता आपल्या वर्तुवणूकीतून आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करण्याची कुवत त्यांच्यात असे. काळ बदलत गेला.व्यक्तिमत्वाचे निकष व पद्धती बदलत गेल्या.शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती हीच यशस्वी जीवनाची संकल्पना निर्माण झाली. Academic successes is the success of Life हीच प्रथा समाज्यात रूढ होत गेली.त्यामुळे समाज्यातील गुरुजानांच्या शिकवणूक/उपदेश व वर्तणुकीत कालानुरूप बदल होत गेले. शैक्षणिक विकास ( मार्क विकास ) / प्रगती हीच आयुष्यातील महत्वाचा भाग बनून गेला. त्यामुळे समाज्याच्या गुरुजानाकडून असणाऱ्या अपेक्षा बदलत गेल्या.वर्तुणूकवादापेक्षा मार्क्सवाद उदयास आला.त्यामुळे समाज्यात मार्क्सवादाचा प्रसार झपाट्याने होत गेला. गुरुजनांवरतीच  मार्क्सवादाचा विजय करण्याची जबाबदारी येऊन पडली. शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करू शकणारी  पाल्य गुरुजनांना अधिक प्रिय होत आहेत.भारतामध्ये मार्क्सवादी पद्धतीचा पाया खोलवर रुतून भासलेला आहे. एखाद्याच्या अंगी असणारा प्रामाणिकपणानिष्ठाआपुलकीनिर्वेसनीकणखरपणा यासारख्या गुणांना असणारे महत्व कमी होत चालले आहे. समाज्यात व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. बालकांना लहानपणापासूनच शैक्षणिक गुण / विकास हाच यशस्वीतेचा एकमेव पाया असल्याचे बिंबवले जात आहे. त्यामुळे बालकांचा फक्त बुद्ध्यांक वाढत चालेला आहे तर भावनांक कमी होत चालला आहे.समाज्याच्या आदर्श निर्मितीसाठी बुद्ध्यांकबरोबर भावनांक महत्वाचा असतो. परंतु  वरील प्रकारच्या घटनाकडे/मूल्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आजच्या व येणाऱ्या घडीला  'गूरुच्या भूमेकेत बदल घडून येणाच्या शक्यता आहेत.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. त्यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रोनिक साधनांचे ज्ञानक्रीडाकलासंभाषणवर्तुवणूकतत्परता  भाषिक ज्ञान यांचा समावेश होणार आहे. त्यामुळे पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर गुरुजनांच्या व्यक्तिमत्वाचीही खरी  कासोटी ठरणार  आहे.                                                                    

             

No comments:

Post a Comment