23 May 2015

अच्छे दिन होंगे ...

                                                         
चालू व पुढील आठवड्याचा प्रत्येक दिवसाची सुरुवात व शेवट हा "नरेंद्र मोदी व एक वर्ष", "अच्छे दिन और भाजप सरकार", "भाजप सरकार: एका वर्षाचा पंचनामा" यासारख्या विषयांनी होतो. माध्यमे व जनता  यांच्यात फक्त याच विषयावर चर्चा सतत चालू असते. किंबहुना फक्त या विषयावरील  चर्चा करणेही परिवर्तनाची व उत्कांतीची मुख्य धार असल्याचे भासवले जात आहे. भाजप सरकारने एका वर्षात हे केले नाही. ते केले नाही. सरकार कोणाचे आहेअच्छे दिन कब आयेंगे ? कब आनेवाले है ? या विषयांना धरून सतत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
भारताचा विकास हा फक्त आणि फक्त भाजप सरकारनेच केला पाहिजेअशी वेडी  आशा प्रत्येक जण बाळगून आहे. त्यामूळे माध्यमे व काही तत्वज्ञानी लोक वरील विषयावर आपले मत मांडत असलेले पहावयास मिळते. परंतु सर्वजण हे विसरतात कीसामाजिक सुधारणा करणे,नवीन  योजना व धोरण निर्माण करणेत्याची अंमलबजावणी करणेनवीन संकल्पनांचा अवलंब करणेहे कार्य फक्त सरकारचेच कार्य आहे. त्यामध्ये विरोधी पक्ष व इतर अन्य पक्षसर्वसामान्य जनता,  माध्यमे व संस्था - संघटना यांची भूमिका महत्वाची नाही का ? आज विरोधी पक्षाची भूमिका व विचारधारासर्वसामान्य जनतेचा सहभागमाध्यमांचे कार्य व पारदर्शीपणायाबाबत कधीच कोणी कसे काय बोलत नाही..याबाबत कोणत्या माध्यमांनी चर्चा घडवून आणलीत्याप्रकारचे सर्वे कधी का केले जात नाहीत. प्रशासकिय नोकरशाहीची कार्यक्षमता ? याचे मोजमाप का कधी केले जात नाही...फक्त आणि फक्त सरकार ..सरकार आणि सरकार. जर खऱ्या अर्थाने बदल घडवून आणायचे असतील तर सरकार बरोबर जनतामाध्यमेप्रशासकीय नोकरशाही,  संस्था - संघटनाविरोधी पक्ष या सर्वांच्या कार्याचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे. मग सरकार कोणाचेही असो. अच्छे दिन आयेंगे नही ? अच्छे दिन होंगे...

No comments:

Post a Comment